मुख्य अभियंता घुगे यांच्या रूपाने आणखीन एक राजकीय बळी !



चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन चे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या बदलीने वातावरण तापले असून घुगे यांच्या रूपाने पुन्हा एक राजकीय बळी गेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ही राजकीय खेळी सुरू असून नुकतेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांच्या झालेल्या बदलीनंतर जिल्ह्यातील सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांच्या कट कारस्थानावर सामान्य जनता आपला रोष प्रकट करून राहिली आहे. मागील दहा दिवसापासून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये प्रकल्पग्रस्तांचे चिमणी वरून आंदोलन सुरू होते. अनेक वर्षापासून या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात शासन अपयशी ठरली. होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी चिमणी वर चढून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झाल्यानंतर शासन हादरले, अखेर प्रकल्पग्रस्तांनी 10 दिवसांनंतर हे आंदोलन मागे घेतले. याचाच वचपा काढण्यासाठी मुख्य अभियंता राजू घुगे यांची आकस्मिक बदली करण्याचे राजकीय षडयंत्र खेळण्यात आले. राजू घुगे यांच्या कार्यकाळात फक्त एक वर्षाच्या अवधी झाला होता. त्यांचे उत्कृष्ट कार्य व नम्र स्वभाव हा अनेकांची मने जिंकून गेला होता. अशातच त्यांची झालेली बदली राजकारणाच्या भाग असल्याचे सांगण्यात येत असून जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे.
मुख्य अभियंता राजू घुगे यांची बदली, पंकज सपाटे नवे मुख्य अभियंता !
मुंबई महानिर्मितीद्वारे निर्गमित झालेल्या स्थानांतरण आदेशाद्वारे चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांची भुसावळ येथे तर भुसावळचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची चंद्रपूर वीज केंद्रात बदली करण्यात आली आहे. चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांना चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राचा दांडगा अनुभव होता. त्यांनी १ जून २०१९ ला चंद्रपूरचे मुख्य अभियंता म्हणून सूत्रे हाती घेतली. या दरम्यान त्यांनी विजेची अधिकाधिक निर्मिती होईल, याकडे विशेष लक्ष दिले. मनमिळाऊ व शांततापूर्वक औद्योगिक समस्येचे निराकरण करण्याची त्यांची शैली होती, मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर येणारे भुसावळ वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे चंद्रपूरचे मूळ निवासी आहेत.


अखेर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे !
चंद्रपूर : औष्णिक वीज केंद्राच्या चिमणी वर चढलेले ७ प्रकल्पग्रस्त १० दिवसांच्या आंदोलनानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खाली उतरले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सिटीपीएस विश्रामगृहावर ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांची लवकरच ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यामध्ये यासंदर्भात अंतिम तोडगा निघणार आहे.
तथापि,या वेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.