वाहनाच्या नियमात बदल



आजपासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषत: वाहतुकीच्या नियमांमध्ये हे बदल झाले आहेत.
पोलिसांनी तुम्हाला थांबवल्यास त्यांना डिजिटल डॉक्युमेंट्स दाखवण्याची परवानगी आजपासून सर्वांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहन चालवताना लायसन्ससहित कोणत्याही प्रकारची कागदपत्रे बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. वाहन चालवताना आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट (PUC) यांसारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही.
केंद्र सरकारकडून मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध बदलांसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध बदलांसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.
आजपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जातील.
पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होईल. यासाठी डिजिटल कागदपत्रांची आरटीओकडून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असेल.
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केला जाऊ शकतो, परंतु हा केवळ मार्ग शोधण्यासाठी, नेव्हिगेशनसाठीच असावा. तसेच, यावेळी वाहन चालवताना लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आयटी सेवांचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीमुळे वाहतुकीचे नियम पाळण्यास मदत होईल आणि यामुळे वाहनचालकांना त्रास देण्याचे प्रकारही थांबतील असा विश्वास यावेळी मंत्रायलयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.चालकांनी दिलेल्या नेव्हिगेशनसाठी मोबाईलचा वापर कसा करायचा याची नियमावलीही मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये मोबाईल फोन गाडीच्या डॅशबोर्डला लावणं बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होणार नाही.
दरम्यान, वाहन चालवताना चालक फोनवर बोलत असेल तर त्याला अडवल्यास दंडही भरावा लागणार आहे. पोलिसांनी फोनवर बोलताना चालकाला अडवल्यास त्याच्याकडून १ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.