संघटनात्मक बांधणीतून समाजाची प्रगती निश्चित - विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार




महाराष्ट्राच्या भूमीला अनेक बहुजन संतांचा वारसा लाभला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी जुन्या चालीरीती ,परंपरा ,रुढी व अंधश्रद्धेला बाजूला सारून समाजाने एक संघ होऊन संघटित झाल्यास समाजाचा विकास नक्कीच शक्य आहे .असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे अखिल कुणबी समाज मंडळ द्वारा आयोजित उपवधू वर परिचय मेळाव्यात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.


आयोजित कार्यक्रमास प्रामुख्याने उद्घाटक म्हणून खासदार सुनिल मेंढे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सुभाष धोटे होते. सत्कारमूर्ती म्हणून विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडीया हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार परिणय फुके, माजी आमदार सेवक वाघाये, जि.प. माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, सकाळचे पत्रकार प्रमोद काकडे, जिल्हा पणन अधिकारी विष्णू तिवाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दामोधरजी मिसार, शिवतीर्थचे संचालक डॉ. अभिविलास नखाते यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.


पुढे बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, धर्मांधतीमुळेच समाजाच्या उन्नतीसाठी अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या चा खून करण्यात आला. संत तुकोबाचे विचाराने कुणबी समाज हा सर्व क्षेत्रात प्रगतशील समाज म्हणून उभा झाला पाहिजे. समाजातील गरीब श्रीमंत यामधील दरी मिटवून सामूहिक सोहळ्यातून समाजाला आर्थिकरित्या प्रगतशील बनविणे हे प्रत्येक समाज बांधवांची जबाबदारी आहे. 


समाजातील होतकरू हुशार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने खंबीर पणे उभे राहून समाजातील गुणवंतांना पुढील दिशा दाखवावी. कुणबी समाजाने ब्रह्मपुरी येथे जागा घेऊन जे सभागृह उभारणार आहे ते विचारांची आदान प्रदान करणारे प्रेरणास्थान म्हणून उद्या असावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. मी मंत्री असताना विशेष शिष्यवृत्ती योजना लागू करून ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. 


ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाज मंडळाने जो पुढाकार घेतला आहे त्यासाठी निधी कमी न पडू देता सदैव कुणबी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित त्यांना दिली. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्यातील तसेच संपूर्ण जिल्हा व  लगतच्या जिल्हा परिसरातील हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्योती दूफारे यांनी तर प्रास्ताविक गोविंदराव भेंडारकर
आभार मोंटु पिलारे
पाहुण्यांच्या परिचय प्रमोद चिमुरकर यांनी करून दिला.